
मुंबई : नवी दिल्ली येथील साहित्य संमेलनात उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेले विधान मूर्खपणाचे होते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गोऱ्हे यांना फटकारले. तसेच गोऱ्हे यांनी विधानपरिषदेच्या मिळवलेल्या चार टर्म आणि केलेल्या राजकीय प्रवासाचा पवार यांनी अक्षरशः पंचनामा केला.