पक्षांतर करणाऱ्यांना जागा दाखविणार - शरद पवार

Sharad Pawar
Sharad Pawar

परभणी - जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शक्तीवर निवडून आले, ज्यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी करून काम केले, ते आज पक्षाला सोडून गेले. जे गेले त्यांचे राजकीय भवितव्य हेच तरुण कार्यकर्ते अंधकारमय करतील. त्यातला एकही आमदार परत निवडून येणार नाही, अशी व्यवस्था आपण केली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी केले.

शहरातील श्री कृष्ण गार्डन मंगल कार्यालयात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. पवार म्हणाले, ‘‘राज्य विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे. देशातील परिस्थिती समजून घ्यावी यासाठी मी महाराष्ट्रात फिरत आहे. राज्यात अराजकता माजली आहे. शेतकरी, उद्योजक, व्यापारी कोणीही सुखी नाही. त्यासाठी एकसंध होऊन सत्तापरिवर्तन करावे लागेल. राज्यातील भाजप सरकार छत्रपतींचे नाव घेऊन राजकारण करत आहे; परंतु त्यांचे हे राजकारण बेगडी असून अशा फसव्या लोकांपासून जनतेने सावध राहावे.’’

किल्ल्यांचा प्रश्न उपस्थित करून ज्या किल्ल्यांमधून महाराजांची तलवार स्वराज्यासाठी चमकली, त्याच किल्यांत आता छम छम सुरू करण्याचा घाट भाजप सरकार घालत आहे, तो डाव हाणून पाडला पाहिजे असे ते म्हणाले. ज्या आमदार, नेत्यांनी पक्ष सोडला आहे, त्यातील एकही नेता यापुढे निवडणुकांमध्ये निवडून येणारच नाही असे सांगत, भाजपकडे संपत्तीचा डोंगर असेल तर आमच्याकडे तरुणांचा सागर आहे. या सागराच्या जोरावर परत आम्ही सत्ता स्थापन करू, असा दावा त्यांनी या वेळी केला. 

देशातील शेकडो कारखाने बंद पडत आहेत, त्यामुळे तरुणांच्या हाताला काम राहिलेले नाही. 
- नांदेडमधील सभेत

विकासकामांचे कारण सांगून पक्षांतर करणाऱ्या या लोकप्रतिनिधींनी मंत्री असताना काय काम केले?
- वसमत (जि. हिंगोली) येथील सभेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com