

कोल्हापूरः ‘‘दावोसमधून महाराष्ट्रात उद्योग आणल्याचा देखावा करण्यात आला आहे. काल जे करार झाले त्यापैकी अनेक कंपन्यांचे करार तीन वर्षांपूर्वी झाले होते. जिंदाल कंपनी ही महाराष्ट्रातील आहे. मात्र त्यांच्याशी करार दावोसमध्ये केला. त्यामुळे इथल्याच कंपन्यांना दावोसमध्ये नेऊन करार केल्याचे दिसते. यातून दावोसमधून त्यांना महाराष्ट्रात आणल्याचा देखावा करण्यात आल्याची टीका खासदार शरद पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.