

'Vivekachi Vari' (Procession of Reason) to be held from Sindkhed Raja to Pandharpur between 10th to 18th July
Sakal
ईश्वरपूर (जिल्हा सांगली) : मध्ययुगापेक्षाही गुंतागुंतीच्या आणि विवेक हरवत चाललेल्या आजच्या काळात संत-समाजसुधारकांचा ज्ञानमार्ग धूसर होतोय, परंपरांचे अपहरण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर साहित्यिक, कलावंत, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत 'विवेकाची वारी' सुरू केली आहे. मातृतीर्थ सिंदखेडराजा येथून लोकतीर्थ पंढरपूरपर्यंत निघालेल्या या वैचारिक वारीतून 'भेदाभेद भ्रम अमंगळ'चा जागर करत समता, मानवता आणि विवेकाचा संदेश दिला जाणार आहे. १० ते १८ जुलै दरम्यान ही वारी निघणार आहे. आषाढी वारीच्या गर्दीत भक्ती आणि विवेकाचा संगम घडवणाऱ्या या 'विवेकाच्या वारी'त महाराष्ट्रातील प्रत्येक लेखक-विचारवंताने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.