
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत ९४.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील नऊ विभागीय मंडळातून १५ लाख ४६ हजार ५७९ नियमित विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी १४ लाख ५५ हजार ४३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल ९८.८२ टक्के असा सर्वाधिक असून, सर्वांत कमी निकाल नागपूर विभागाचा ९०.७८ टक्के आहे. बारावीप्रमाणेच दहावीचा निकालही यंदा घसरला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल १.७१ टक्क्यांनी कमी झाला आहे.