

CM Devendra Fadnavis
Esakal
35000 Crore Farmer Loan Relief Proposal in State Budget कर्जबाजारीपणामुळे संकटात सापडलेल्या बळिराजाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकार 'शेतकरी कर्जनिवारण' योजना आणण्याच्या तयारीत आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी अंदाजे ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद आवश्यक असल्याचे समोर आले असून, राज्याच्या आगामी अर्थसंकल्पी अधिवेशनात याची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. ही योजना केवळ तात्पुरती कर्जमाफी न राहता, शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी सक्षमीकरणासाठी 'कर्जनिवारण' या स्वरूपात राबवली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.