Monsoon
sakal
पुणे - मॉन्सूनची आतापर्यंत वाटचाल कशी राहिली आहे, याचे प्रतिबिंब जूनच्या पहिल्या पंधरवड्याच्या पर्जन्यमानाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. देशात एक ते १५ जून या काळात सरासरीच्या तुलनेत ३२ टक्के कमी पाऊस झाला असून, राज्यातील पावसाची तूट तब्बल ७२ टक्के आहे. देशाच्या ७१ टक्के भूभागावर अपुरा किंवा त्यापेक्षाही कमी पाऊस झाला असल्याचे हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.