सोलापुरात 15 दिवसांचा कडक लॉकडाऊन करा, माजी पालकमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

vijaykumar deshmukh
vijaykumar deshmukh

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या व मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही संख्या कमी करण्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यात किमान पंधरा दिवसांची कडक संचारबंदी/लॉकडाऊन जाहीर करावा अशी मागणी सोलापूरचे माजी पालकमंत्री तथा भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे व सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना पाठविले आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन स्तरावरून कडक उपाययोजना होणे आवश्‍यक आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांकडून आणि अधिकाऱ्यांकडून संचारबंदीचे पालन केले जात नाही. सर्रास सर्वच बाजारपेठेत गर्दी बघायला मिळत आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे. प्रतिबंधित क्षेत्रातूनही नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत. या सर्व गोष्टींचा विचार केला असता सोलापूर शहरात वाढत चाललेल्या रुग्णसंख्येवर आळा बसणार तरी कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सोलापूर शहर कोरोना मुक्त करायचे असेल तर शहर आणि जिल्ह्यात लॉकडाऊन/कडक संचार बंदीची अंमलबजावणी करावी. आरोग्य विभागामार्फत थर्मल स्कॅनिंगद्वारे प्रत्येक घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी करावी. जेणेकरून कोरोना व सारी आजार असलेल्या रुग्णांचे वेळीच निदान होऊन त्यांच्यावर उपचार करता येतील. या अगोदर सोलापूर शहरात एकही रुग्ण नसताना लॉकडाऊन आणि संचारबंदीची अंमलबजावणी होत होती. परंतु सद्यःस्थितीत रुग्ण संख्या वाढत असताना संचारबंदी व लॉकडाऊनची आवश्‍यकता असताना ती केली जात नाही. त्यामुळे सोलापूर शहरातील तमाम नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा मुद्दाही भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी उपस्थित केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com