

जळगाव : ‘‘राज्यात कोण कोणाला भेटले, का भेटले यावरून राजकारण होत असेल तर ते महाराष्ट्रासारख्या राज्यातील लोकशाहीसाठी योग्य नाही. सरपंच देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आमदार सुरेश धस यांनी घेतलेली भूमिका खंबीर व ठाम स्वरूपाची असून त्यांनी त्यात पुढाकार घेतल्याने काहींच्या पोटात दुखतेय,’’ अशी खोचक टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.