Nana Patole : आरक्षणाचा वाद ‘महायुती’नेच पेटवला;पटोले यांचा उलटवार,विरोधकांवर कसले खापर फोडता?

राज्यात मराठा, ओबीसी आरक्षणाचा वाद महायुती सरकारनेच पेटवला असून मराठा आरक्षण रखडण्याचे पापही भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांचेच असल्याचा पलटवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केला.
Nana Patole
Nana Patole sakal
Updated on

मुंबई : राज्यात मराठा, ओबीसी आरक्षणाचा वाद महायुती सरकारनेच पेटवला असून मराठा आरक्षण रखडण्याचे पापही भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांचेच असल्याचा पलटवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केला.

मराठा व ओबीसी या समाजांना दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्याची जबाबदारी सरकार म्हणून तुमचीच असताना विरोधी पक्षांवर कसले खापर फोडता, असा सवालही त्यांनी यावेळी केला. पटोले यांनी भाजप सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला

. ते म्हणाले की तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आघाडी सरकारने २०१४ मध्ये मराठा समाजाला आरक्षण दिले होते पण त्यानंतर सत्तेत आलेल्या भाजप सरकारने मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर न केल्याने ते आरक्षण गेले. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी देवेंद्र फडणवीसच आहेत. सत्तेत आल्यास मराठा, धनगर, हलबा, यांच्यासह विविध जाती जमातींना आरक्षण देण्याचे आश्वासन २०१४ मध्ये फडणवीस यांनीच दिले होते.

केंद्रातील भाजप सरकारनेच २०१७ मध्ये शरद पवार यांनी पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले आणि आता त्यांना शरद पवार भ्रष्टाचाराचे सरदार कसे वाटू लागले. देशात भ्रष्टाचाराचा सरदार कोण असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com