महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यातील नद्या सर्वाधिक प्रदूषित

महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यातील नद्या सर्वाधिक प्रदूषित
Updated on

नदी हे माणसासाठी पाण्याचं मुख्य स्रोत असलं तरी, माणसाकडून या मुख्य स्रोतालाच मोठ्या प्रमाणावर प्रदूषित करण्यात आलंय. देशाचा विचार केला तर, दुदैवानं महाराष्ट्रातील नद्या सर्वाधिक प्रदूषित आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 2019च्या अहवालात महाराष्ट्रातील 45 नद्या प्रदूषित असल्याचं म्हटलंय. महाराष्ट्रातील नागरिकांसाठी ही चिंतानजक बाब आहे. 

नद्या काय प्रदूषित होत आहेत?

दिल्लीतील यमूना नदीचे फेसाळलेले फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यमूना नदीचं प्रदूषण हा दिल्लीकरांसाठी चिंतेचा विषय आहे. पण, त्याही पेक्षा जास्त प्रदूषित नद्या या महाराष्ट्रात आहेत.

गंगा नदीचं प्रदूषण दूर करण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केलेली आहे. त्या योजनेची अंमलबजवणी कितपत झाली? गंगा प्रदूषण मुक्त झाली का? याविषयी शंका उपस्थित केल्या जातात. केंद्र सरकारच्या अहवालानुसार महाराष्ट्रात तापी नदी सर्वाधिक प्रदूषित आहे.

नागपूर, कोल्हापूर या जिल्ह्यातील नद्या सर्वाधिक प्रदूषित आहेत. शहरातील सांडपाणी, साखर कारखान्यातून बाहेर पडणारा मैला, कापड कारखान्यांमधून बाहेर पडणारे केमिकल मिश्रित पाणी, सण-उत्सवांमध्ये नद्यांत सोडण्यात येणारे निर्माल्य यामुळं पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या नद्या प्रदूषित होत आहेत.

या जिल्ह्यांतील नद्या प्रदूषित

नागपूर
अहमदनगर
कोल्हापूर
जळगाव
पुणे
ठाणे 
अकोला
पालघर 

असा काढला जातो निष्कर्ष

नद्यामधील प्रदूषणाची पातळी तपासताना केवळ नदीतील पाण्याचे नमुने नाही तर, नदीच्या परिसरातील विहिरी, कूपनलिका यामधून उपसण्यात येणाऱ्या पाण्याची गुणवत्तीही तपासली जाते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने 288 पाण्याचे आणि 66 भूजलाचे नमूने तपासून पाणी प्रदूषणाचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात तापी नदी सर्वाधिक प्रदूषित असल्याचे सांगितले जाते.

अहवालानुसार ठाणे जिल्ह्यातील काही ठिकाणचे पाणी सर्वाधिक प्रदूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, पुणे, नाशिकमधील अनेक ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे अहवालात म्हटले आहे. 

या नद्या आहेत प्रदूषित

राज्यात तापी नदीनंतर विदर्भात वर्धा, वैनगंगा, प्राणहिता या नद्या प्रदूषित आहेत. त्याचबरोबर मुंबईत मिठी, पुण्यातील मुळा-मुठा, ठाण्यातील उल्हास, कोल्हापुरात पंचगंगा या नद्या प्रदूषित आहेत. कोल्हापुरात साखर कारखाने आणि विशेषतः इचलकरंजीतील वस्रोद्योगामुळे पंचगंगेचे पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत आहे.

इचलकरंजीतील काळ्या ओढ्यातील केमिकल मिश्रित पाणी पंचगंगेत मिसळत असून, तेच पाणी पुढे कृष्णा नदीला येऊन मिसळत आहे. औद्योगिक क्षेत्रामुळं होत असलेल्या प्रदूषणाला आळा घातला तरी, नद्याचं प्रदूषण मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com