गुरुकुंज मोझरी : शेतकरी व सामान्य जनतेची ताकद काय असते, हे या सरकारला दाखवून देण्याची वेळ आली आहे. हे सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करणारे आहे, अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी मोझरी येथील अन्नत्याग आंदोलनादरम्यान महायुती सरकारवर केली..माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाच्या व्यासपीठावरून ते बोलत होते.ते म्हणाले, की तुमच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांसह जनतेला खोटी आश्वासने दिली. महाविकास आघाडी सरकारने तीन लाखांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू, असे म्हटले होते, तर महायुती सरकारने त्याही पलीकडे जाऊन पूर्ण सातबारा कोरा करू, असे आश्वासन दिले होते. .मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी थोडी तरी लाज वाटू द्यावी, शेतकऱ्यांना फसवून तुम्ही सत्तेत बसले आहात. सातबारा तर कोरा केला नाही, परंतु महाराष्ट्र कोरा करायला निघाले, अशी टीका केली. यावेळी संभाजीराजे छत्रपती, खासदार अमर काळे, आमदार रोहित पवार आदी उपस्थित होते..राज्यातील शेतकरी, कष्टकरी यांच्या मागण्यांसाठी आम्ही बच्चू कडू यांच्यासोबत आहोत. परंतु या सरकारचा माज व घमेंड वाढल्याने यांना शेतकऱ्यांचे काहीही देणे-घेणे नाही. तुम्ही जर शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असाल तर आम्हीदेखील रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी तयार आहोत.रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.