महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमेवर नाकाबंदी सुरु होती. याचदरम्यान, नक्षलवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन पोलिस शहीद झाले आहेत. तर एकजण जखमी झाला आहे.
महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या छत्तीसगड राज्यातील बोरतलाव पोलीस चौकीअंतर्गंत आज (दि. 20) सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास 10-12 च्या संख्येत असलेल्या महिला पुरुष नक्षल्यांच्या टोळीने विनाशस्त्र चहा पिण्याकरीता गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला केला.
या घातपाती हल्ल्यात दोन पोलिस शहीद झाले आहेत. या घटनेनंतर महाराष्ट्र व छत्तीसगड सीमेवर पोलिसांनी बंदोबस्त वाढविला असून जंगलात शोधमोहिम सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज सोमवारला बोरतलाव पोलीस चौकीतील राजेश प्रतापसिंह व ललीत यादव आपल्या एका सहकारी मित्रासह मोटारसायकलने चहा पिण्याकरीता पोलीस चौकीपासून मुख्य राज्यमार्गावर गेले होते.
यावेळी अचानक नक्षल्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर तिसरा जखमी असून जखमी शिपायामुळेच सदर घटना पोलिसांना कळल्याचे वृत्त आहे. दरम्यान नक्षल्यांनी मोटारसायकलला आग लावून घटनास्थळावरुन पोबारा केला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.