मुंबई: विधीमंडळ अर्थसंकल्पी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला सडेतोड उत्तर दिलं आहे. ईडीच्या सहाय्याने कुटुंबियांची बदनामी करण्याचं कृत्य हे नीच असून ही अघोषित आणीबाणी असल्याची टीका त्यांनी केली आहे. (Uddhav Thackeray)
मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की, सकाळचा शपथविधी यशस्वी झाला असता तर तुम्ही नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या मांडीला मांडी लावून बसला असता. आम्ही जर का तुमचा पट्टा गळ्यात बांधला असता तर माझ्या कुटुंबीयांवर आच आली नसती. पुढे ते म्हणाले की, हे नीच, निंदनीय आणि विकृत गोष्ट आहे की, एकमेकांच्या कुटुंबियांची बदनामी करणे. मर्द असशील तर मर्दासारखा ये पुढे. सत्तेचा दुरुपयोग, केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयो करण्यात कसला आलाय मर्दपणा? तुम्ही आमच्या कुटुंबाची बदनामी करताय, हा नीचपणा आहे. दुसऱ्यांना वाईट म्हणताय पण तुम्ही किती चांगले आहात? असाही सवाल त्यांनी केलाय. पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, इंदिरा गांधी यांनी किमान आणीबाणी घोषित केली. मात्र, ही अघोषित आणीबाणी आहे. इंदिरा गांधी डरपोक नव्हत्या. (Uddhav Thackeray)
पुढे ते म्हणाले की, तुम्हाला सत्ता हवीय ना? म्हणून तुम्ही कुटुंबियांची बदनामी करत आहात, असे चाळे करत आहात ना? चला मी या सगळ्यांसमोर सांगतो की, उगाच पेन ड्राईव्ह गोळा करायला जाऊ नका, त्यासाठी खर्च करु नका. मी म्हणतो मी तुमच्या सोबत येतो. सत्तेसाठी नाही येत. तुम्ही जे चाळे केले आहेत. कुटुंबियांची बदनामी करण्याचे... मी याला घाबरत नाही. पण मी येतो.. इतका जीव जळतो तर... मला टाका तुरुंगात... मी माझ्या शिवसैनिकांची जबाबदारी घेतो.. पण त्यांना छळू नका.. असंही मुख्यमंत्री म्हणाले. (Uddhav Thackeray)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.