

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. या निमित्ताने लाखो शिवभक्त विविध गड-किल्ल्यांवर महाराजांना अभिवादन करण्यासाठी पोहोचले आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या किल्ल्यांपैकी एक असलेल्या रायगडावर आज शिवभक्तांची प्रचंड गर्दी दिसून आली. "छत्रपती शिवाजी महाराज की जय!" या घोषणांनी संपूर्ण किल्ला दणाणून गेला.