उजनी धरणाचा पाणीसाठा पोचला 110 टक्‍यांवर 

उजनी धरणाचा पाणीसाठा पोचला 110 टक्‍यांवर 

सोलापूर ः जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण 110 टक्के भरले आहे. धरणात पुणे जिल्ह्यातून पाणी येत असल्याने नदीसह बोगदा, कालव्यातून पाणी सोडणे सुरु केले आहे. दौंड येथून धरणात अद्यापही सात हजार 58 क्‍सुसेकने पाणी येत आहे. 

पुणे जिल्ह्याच्या पावसावर उजनी धरणाची मदार आहे. त्याठिकाणी पाऊस झाला तरच धरण 100 टक्‍याच्या पुढे भरते. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या पावसाऐवजी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्यादृष्टीने पुणे जिल्ह्यात पाऊस पडणे महत्वाचे असते. धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये येणाऱ्या तालुक्‍यातील शेतकऱ्यांची ही इच्छा यंदाच्या वर्षी वरुणराजाने पूर्ण केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ढोल-ताशाच्या गजरात या पाण्याचे पूजनही शेतकऱ्यांनी केले आहे. 

धरणात सध्या बंडगार्डन येथून नऊ हजाराच्या पुढे येत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. धरण शंभर टक्‍याच्यावर भरल्यामुळे धरणातून पाणी सोडण्यास लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने सुरवात केली आहे. धरणात सध्या बोगद्याच्या माध्यमातून 900 क्‍सुसेक, सीना-माढा उपसा सिंचन योजनेसाठी 299 क्‍सुसेक, दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी 105, मुख्य कालव्यातून दोन हजार 400, विद्युत निर्मितीसाठी एक हजार 600 तर नदीद्वारे दोन हजार 500 क्‍सुसेकने पाणी सोडले आहे. धरणाता एकूण 41 दरवाजे आहेत. त्यापैकी दोन दरवाज्यातून हे पाणी सोडले जात आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com