
पुणे - कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, यंदा अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने न राबविता उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर राबविण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अकरावीची प्रवेश प्रक्रिया मुंबई, पुणे, नागपुर, नाशिक, अमरावती, कोल्हापुर, औरंगाबाद आणि महानगरपालिका असणाऱ्या इतर महानगरांतंर्गत येणाऱ्या उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात ऑनलाइन केंद्रीय पध्दतीने राबविण्यात येते. मात्र यावर्षी कोरोनाच्या संसर्ग रोखण्यासाठी असलेल्या लॉकडाऊनमुळे इयत्ता दहावीचे निकाल उशीरा लागण्याची शक्यता आहे. परिणामी अकरावी प्रवेश प्रक्रिया देखील उशीरा सूरू होईल. दरवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत ही प्रक्रिया असते. त्यामुळे शैक्षणिक वर्ष प्रत्यक्षात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सूरू होते.
मात्र ही प्रवेश प्रकिया नसलेल्या ठिकाणी जुलैपासून अकरावीचे शैक्षणिक वर्ष सूरू होते. यावर्षी अकरावीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया उशीरा सूरू होण्याची शक्यता असून प्रत्यक्षात वर्ग देखील सप्टेंबरनंतर सूरू होतील. तसेच केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत मार्गदर्शन केंद्रांवर विद्यार्थी आणि पालक तसेच शिक्षक यांची गर्दी असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही गर्दी टाळणे गरजेचे आहे. म्हणूनच यंदा अकरावीचे प्रवेश उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर योग्य मार्गदर्शिका सूचीनुसार राबविण्यात यावी, असे महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय शिंदे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.