

Baji Prabhu Deshpande descendants
esakal
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे वीर बाजीप्रभू देशपांडे हे निष्ठेचे सर्वोच्च प्रतीक आहेत. पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटून विशाळगडाकडे कूच करणाऱ्या महाराजांचे संरक्षण करण्यासाठी बाजीप्रभूंनी केवळ ३०० मावळ्यांसह घोडखिंडीत हजारो शत्रूंना रोखून धरले. जोपर्यंत महाराज सुखरूप गडावर पोहोचल्याचा तोफेचा आवाज आला नाही तोपर्यंत रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ते लढत राहिले. त्यांच्या या बलिदानामुळेच ही खिंड 'पावनखिंड' म्हणून इतिहासात अजरामर झाली. बाजीप्रभूंच्या या अतुलनीय शौर्याचा वारसा आजही त्यांच्या वंशजांनी अभिमानाने जिवंत ठेवला आहे.