Sharad Pawar:
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी भाजप सरकार जाणार म्हणून विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांना लोक स्वीकारत आहेत, असेही भाष्य केलं. तसेच लोकसभा निवडणूकीत लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींना नाकारत असल्याचे म्हटले.
शरद पवार यांनी इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. २०२४ ची निवडणूक आधीच्या निवडणुकीपेक्षा खूप वेगळी आहे. राजकीय पक्षांच्या मोठ्या वर्गाचा आता भाजप आणि नरेंद्र मोदी आवडत नाहीत. ते सर्व पक्ष आता एकत्र येत आहेत.
देशाचा मूड नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बदलत आहे. आम्ही महात्मा गांधी आणि नेहरुंच्या विचारांना अनुसरुन सकारात्मक दिशेने वाटचाल करत आहोत. आता अनेक तरुण लोक गेल्या निवडणुकीच्या तुलनेत पक्षाशी जुळवून घेत आहेत. आता परिस्थिती जनता पक्षासारखी होऊ शकते. १९७७ मध्ये अनेक पक्ष एकत्र आल्यानंतर जनता पक्षाची स्थापना झाली. नंतर त्यांनी सरकार स्थापन केले.
त्यावेळी देखील विरोधकांनी पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. जयप्रकाश नारायण आणि जे.बी. कृपलानी यांनी जनता पक्ष स्थापन करण्यासाठी विलीन झालेल्या विविध पक्षांच्या खासदारांशी बोलून मोरारजी देसाई यांची नंतर पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली. १९७७ मधील मोरारजी देसाईंपेक्षा आज राहुल गांधींचा स्वीकार जास्त आहे.
महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षावर शरद पवार म्हणाले की, त्यांना सध्याच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाविरुद्ध “अंडरकरंट” जाणवत आहे.
बारामतीत यावेळी काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. काल ७ मे ला बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान झाले. यावर शरद पवार यांनी एका शब्दात उत्तर दिले.
" जीत रहे हैं ..."
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.