पाच वर्षात भाजपकडून का नाही मिळाले धनगर समाजाला आरक्षण?; समाजाकडून पडळकरांचा निषेध

Why did not Dhangar Samaj get reservation from BJP in five years
Why did not Dhangar Samaj get reservation from BJP in five years

सोलापूर : यापुढे धनगर समाजाच्या कोणत्याही कार्यक्रमात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना बोलवणार नाहीत, असा निर्णय घेऊन पाच वर्ष केंद्रात आणि राज्यात भाजपचेच सरकार होते. मग का आरक्षण मिळाले नाही, असा प्रश्‍न अखेरचा लढा धनगर आरक्षणाचा या समितीचे प्रवर्तक उत्तमराव जानक यांनी केला आहे. 
अखेरचा लढा धनगर आरक्षणाचा या समीतीची बैठक आज झाली. समितीत आमदार पडळकर हे सहकारी असल्याचे जानकर यांनी सांगितले. आमदार पडळकर यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यावर वादगस्त विधान केले. त्यांच्या या विधानाचे राज्यात पडसाद उमटले. धनगर समाजातील नेत्यांनी ही आमदार पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या धनगर  समाजाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचेही जानकर यांनी सांगितले आहे.
गोपीचंद पडळकर यांच्या बेताल वक्तव्यामुळे धनगर समाजाची मानहानी झाली आहे. शिवाय आरक्षणाचा मुद्दा ही बाजूला गेला आहे. त्यामुळे अशा बेताल व्यक्त करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पडळकर यांना यापुढे आरक्षण लढ्यात कुठे सहभागी करून घेतले जाणार नसल्याचंही त्यांनी जाहीर केले. जनकर यांनी दोन दिवसापूर्वी एक व्हिडीओ करुन पडळकर यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. त्यात त्यांनी म्हटलं होत की, भडक विधान करुन आपल्या प्रसिद्धी दिले जाते. म्हणून करणे चुकीची आहेत. धनगर आणि धनगड याची दुरुस्ती पडळकर यांनी केंद्र सरकारकडून करुन आणावी. महाराष्ट्र सरकारकडून त्याची अंमलबजावणी करुन घेण्याची जबाबदरी मी घेतो. अशी विधान आम्हालाही करता येतात. आरक्षण देतो म्हणणाऱ्या मोदींना आम्हालाही दगलबाज म्हणता येते, देवेंद्र फडणवीसांना भामटा म्हणता येतं परंतु ते आमच्या संस्कृतीत बसत नाही, अशी विधान करुन लोकप्रियता मिळवणं चुकीचे आहे. धनगर आरक्षणाचा विषय हा केंद्राच्या अख्यारितला आहे. मुंबई उच्च न्यायालयात हा प्रश्‍न आहे. तो विषय मी माझ्या हातात घेतला आहे. तो ४-६ महिन्यात सोडवू. पडळकारांची ऐवढी ताकद आहे तर त्यांनी केंद्रातून प्रश्‍न सोडवून आणावा. मी याबाबतची भूमीका ८-१० दिवसात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडणार आहे. परंतु पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाशी जी बेईमानी केली केली ती मांडल्यानंतर पडळकरही भाजपात राहणार नाहीत, याची मला खात्री आहे. त्यानंतर समाजाने आज बैठक घेऊन आमदार पडळकर यांच्याबाबत निर्णय घेतला आहे.

काय म्हणाले होते पडळकर?
'शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. राज्याचे नेतृत्त्व त्यांनी केले पण बहुजन समाजातील लोकांवर अन्याय करण्याची त्यांची भूमिका राहिलेली आहे. त्यांच्या कडे कोणतीही विचारधारा नाही.  फक्त छोट्या छोट्या समाजाना भडकवायचे आणि त्यांना आपल्या बाजूला करायचे आणि अन्याय करायचा एवढेच काम पवार करत आहेत' अशी जहरी टीका गोपीचंद पडळकरांनी  केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com