SSC बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त जागा राखीव ठेवाव्यात; युवक काँग्रेसची मागणी

Youth Congress Demand Maximum reservation should be made for SSC board students
Youth Congress Demand Maximum reservation should be made for SSC board students

मुंबई : SSCच्या विद्यार्थ्यांसाठी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत जास्तीत जास्त जागा राखीव मिळाव्यात अशी मागणी आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे. त्यांनी तसे पत्र वर्षा गायकवाड यांना दिले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

अतिरिक्त अंतर्गत गुणांकन पध्दतीमुळे दिल्ली ICSE व CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांना निकालामध्ये भरमसाठ गुण मिळत असल्यामुळे गुणपत्रिकेच्या टक्केवारीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. याउलट एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुणांकन फक्त 20% असल्याने त्यांचे गुणपत्रिकेत गुण कमी भरतात.परिणामी एसएससीच्या विद्यार्थ्यांवर बोर्डाच्या परिक्षेस सामोरे जाऊनही अकरावीच्या महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेत सरळसरळ अन्याय होणार असल्याची भूमिका सत्यजित तांबे यांनी घेतली आहे.

या पार्श्वभूमीवर SSCच्या विद्यार्थ्यांवर अकरावीच्या महाविद्यालयीन प्रवेशप्रक्रियेत अन्याय होऊ नये यासाठी SSC बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी अकरावीच्या महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेत जास्तीत जास्त जागा राखीव ठेवण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस करत असल्याचे सत्यजीत तांबे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com