
औरंगाबाद: फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ९६ टक्क्यांवर होते. हे प्रमाण आता कमी होत आहे. प्राप्त अहवालानुसार सध्या कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ७७ टक्के आहे. हे प्रमाण घटत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
शहरात फेब्रुवारीच्या मध्यापासून कोरोनाबाधितांची संख्या वाढण्यास सुरवात झाली आहे. गेल्या काही दिवसात तर कोरोनाबाधितांची संख्या रोज एक हजारांच्यावर जात आहे. आठ दिवसांपासून हा आकडा दीड हजारांपर्यंत गेला. वाढत्या रुग्ण संख्येबरोबरच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढणे गरजेचे असताना ते प्रमाण मात्र कमी होताना दिसून येत आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नुकत्याच प्राप्त झालेल्या अहवालानुसार कोरोनामुक्तीचा दर हा ७७ इतका झाला आहे. हा दर वाढण्याची गरज असल्याचे मानले जात आहे. कोरोनाबाधितांची वाढती संख्या व कोरोनामुक्तीचा कमी होणारा दर यामुळे पॉझिटिव्हिटीचा दर ३०.३१ टक्क्यांवर पोहोचला आहे.
महापालिकेच्या माध्यमातून आतापर्यंत १ लाख २२ हजार ५४३ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी ३४ हजार १८३ जणांच्या स्वॅबचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आहेत, तर ८८ हजार ६६ जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. २९४ जणांचे अहवाल येणे बाकी आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.