
महाराष्ट्रासह देशात कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे
औरंगाबाद: महाराष्ट्रासह देशात कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यातून राजकीय नेतेही सुटले नाहीत. छगन भुजबळ, राजेश टोपे अशा अनेक मुख्य नेत्यांसह आमदार, खासदारांंना कोरोनाची बाधा झाली आहे.
औरंगाबादमध्येही मागील चार- पाच दिवसांपासून प्रतिदिन कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत आहे. या दरम्यानच औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. याची माहिती खासदार जलील यांनी ट्विट करून दिली आहे.
पहिली ग्रामपंचायत बैठक ठरली शेवटची...! अपघातात ग्रामपंचायत महिला सदस्या जागीच...
Salaam everyone
I have tested positive for Covid today.
3 days ago I had a few symptoms and had isolated since then.
Have been admitted for further treatment.Stay safe everyone, also remember in prayers.
— imtiaz jaleel (@imtiaz_jaleel) February 22, 2021
'सर्वांना माझा नमस्कार, माझा कोरोनाचा रिपोर्ट पॉझीटिव्ह आला आहे. तीन दिवसांपूर्वी मला कोरोनाची काही लक्षणे दिसली होती. त्यानंतर मी स्वतःला वेगळं केलं होतं. सध्या कोरोनावर उपचार घेत आहे. तुम्ही सर्वजण घरी सुरक्षित रहा'.
पगारासाठी विनाअनुदानित शिक्षकांचा आझाद मैदानात पंचवीस दिवसांपासून धरणे आंदोलन
मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने विविध निर्बंध लादले आहेत. नागरिकांना आवाहनही केलं आहे की, कामाशिवाय बाहेर पडू नका, विनाकारण गर्दी करु नये.