3Admission_4
3Admission_4

अर्धे सत्र संपले तरी अकरावी प्रवेशाची प्रतीक्षा; विद्यार्थी, पालक अन् शिक्षकांची वाढली चिंता

Published on

औरंगाबाद : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने ऑनलाइन शिक्षणावर भर दिला. मात्र, आरक्षणामुळे अकरावीची प्रवेशप्रक्रिया रखडल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अकरावीचे पहिले सत्र संपले तरी प्रवेशप्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांची चिंता वाढली आहे.


यंदा कोरोनामुळे दहावी, बारावीचा निकाल लावण्यास उशीर झाला. त्यानंतर अकरावीची प्रवेशप्रक्रियाही उशिरा सुरू झाली. अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादीतील प्रवेश पूर्ण झाल्यानंतर मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. परिणामी, अकरावी प्रवेशप्रक्रिया रखडली. अकरावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासंदर्भात शिक्षण विभागाने अद्याप कोणताच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे अकरावीचे विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.

प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना अकरावीच्या परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्याप झालेले नाहीत, त्यांना प्रवेशाची चिंता लागली आहे. औरंगाबादेत अकरावी प्रवेशासाठी एकूण ११६ महाविद्यालये असून त्यांची प्रवेश क्षमता ३१ हजार ४६५ आहे. त्यापैकी अर्जाचा भाग एक १९ हजार ५४३ विद्यार्थ्यांनी भरला असून, पडताळणी १९ हजार ३५९ विद्यार्थ्यांनी केली आहे. अर्जाचा भाग दोन १६ हजार ४०४ विद्यार्थ्यांनी भरला.

पहिल्या फेरीसाठी आठ हजार ७४० विद्यार्थ्यांपैकी सहा हजार शंभर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. कोटा प्रवेशात एक हजार ७८२ प्रवेश घेतले. दुसऱ्या फेरीसाठी दोन हजार ८६० विद्यार्थी पात्र ठरले. परंतु, एसईबीसीच्या निर्णयामुळे पुढील प्रक्रिया सध्या स्थगित झाली आहे. प्रवेशप्रक्रिया ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते; पण आता पंधरा दिवस होऊन गेले तरी याबाबत काहीच निर्णय झालेला नाही. ज्यांचे प्रवेश झालेत ते विद्यार्थी त्यांचे क्लास कधी सुरू होणार याची वाट पाहत आहेत. शिक्षण विभागाने अकरावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी कोणतेच नियोजन केले नाही.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com