औरंगाबाद जिल्ह्यात एक हजार कोटींचे पीककर्ज वाटप, दोन लाखावर सभासदांना लाभ

3crop_20loan_9
3crop_20loan_9

औरंगाबाद : खरीप हंगामासाठी जिल्ह्यात सर्व बँकानी पुढे येत शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले आहे. जिल्ह्यात २ लाख ९ हजार ५७९ सभासदाना १ हजार ८४ कोटी ३६ लाख रुपयांची पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. यातील बहुतांश बँकांनी उदिष्टापेक्षा जास्त कर्ज वाटप केल्याची माहीती लिड बँकेचे व्यवस्थापक श्रीकांत कारेगांवकर यांनी दिली.


महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा बँक, सर्वजनिक बँकाबरोबर व्यापारी बँकांतर्फे कर्जवाटपात आघाडी घेतली आहे. जिल्ह्यातील कर्जवाटप मराठवाड्यातील सर्वाधिक वाटप असल्याचेही श्री. कारेगावकर म्हणाले. जिल्ह्यात बँकांतर्फे कोरोनाचा काळातही बँकांनी शेतकऱ्यांचा विचार खरिपासाठीचे कर्जवाटप अंतिम टप्प्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९०.६१ टक्के कर्जवाटप झाले आहे. कर्ज वाटपात यात सर्वाधिक जिल्हा बँकेने वाटप केले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेने ३९६ कोटी.३४ लाखाचे पीक कर्ज वाटप केले आहे. यासह बँक ऑफ महाराष्ट्राने १६१ कोटी कर्ज वाटप केले असेही कारेगांवकर यांनी सांगितले.


बँकेचे नाव------------ कर्जवाटप--------------------------टक्केवारी
जिल्हा मध्यवर्ती बँक--- ३९६ कोटी.३४लाख ------------९६
व्यापारी बँका------------८७ कोटी --------------------------५९.
महाराष्ट्र ग्रामीण बँक-----१७४ कोटी४८ लाख------------१५३
बँक ऑफ महाराष्ट्र------१६१ कोटी ------------ -----------१३०
बँक ऑफ बडोदा------- ४९ कोटी रुपये--------------------११०
बँक ऑफ इंडिया-------- २८ कोटी १८ लाख---------------- १३९
एकूण-----------१०८४ कोटी ३६ लाख-------- ९०.६१--- २ लाख ९ हजार ५७९- सभासद


वैजापूर तालुक्यात पावसाने गाठली सरासरी, जलसाठा समाधानकारक
सतत अवर्षणग्रस्त असणाऱ्या वैजापूर  (जि.औरंगाबाद) तालुक्यात यंदा वरुणराजाने जून महिन्याच्या सुरवातीपासूनच दमदार बॅटिंग केल्याने पावसाने तीन महिन्यातच वार्षिक सरासरी गाठली. यामुळे तालुक्यातील लघु व मध्यम प्रकल्पात समाधानकारक जलसंचय झाला आहे. शिवाय पावसाळा संपण्यास महिन्याभराचा अवधी शिल्लक असल्याने प्रकल्पांतील जलसाठ्यांत आणखीनही भर पडणार आहे.

आगामी काळात तालुक्यातील ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे काम कमी होणार असून रब्बी हंगामही जोमात राहणार असल्याचे संकेत मिळू लागले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नारंगी मध्यम प्रकल्पातही पाणी साठ्यात वाढ होण्यास सुरवात केली आहे. प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता १३.२९० दलघमी इतकी असून क्षमतेच्या १९.१९ टक्के म्हणजेच ४.००२ दलघमी इतका जलसंचय प्रकल्पात जमा झाला आहे.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com