
छत्रपती संभाजीनगर : बेकायदेशीर रस्ता रुंदीकरणाच्या विरोधात तब्बल १०० शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. प्राथमिक सुनावणीत न्या. मंगेश एस. पाटील आणि न्या. वाय.जी. खोब्रागडे यांनी महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागांचे सचिव, जिल्हाधिकारी तसेच प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले.