
लातूर: बाजारपेठेत सोयाबीनचे भाव पडल्याने शासनाने हमी भावाने खरेदी केंद्र सुरु केले. पण रडत पडत ही केंद्रे साडेचार महिने चालविण्यात आली. कधी बारदाने नाही म्हणून केंद्रे बंद राहिली तर कधी धिम्या गतीने खरेदी सुरु राहिल्याने आठ-आठ दिवस वाहनांच्या रांगा लागल्या. असे करीत शासकीय सोयाबीन खरेदीची मुदत संपली. यात नोंदणी करुनही राज्यात अडीच लाख शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी झाले नाही. यात मराठवाड्यातील दीड लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे. शासनाने खरेदीसाठी मुदत वाढ देण्याची किंवा भाव फरक देवून दिलासा द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.