
घाटनांदूर : पिंपरी (ता.अंबाजोगाई) येथे नगर भोजनातून २०६ ग्रामस्थास विष बाधा झाली असून काही ग्रामस्थांवर गावातच प्राथमिक उपचार करण्यात आले तर काही जणांवर अंबाजोगाई व लातूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सर्वाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सहाय्यक जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे यांनी दिली.