हिंगोली जिल्‍ह्यात ४२ कोटी साडेपाच हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 

money
money

हिंगोली ः शासनाकडून घोषित करण्यात आलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये पात्र ठरलेल्या जिल्‍ह्यातील ९७,०८५ शेतकऱ्यांपैकी मागील दोन दिवसांत कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या पाच हजार ५२१ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्यांच्याकडे असलेल्या कर्जापोटी ४२ कोटी रुपये रुपये जमा झाले आहेत. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घेण्यासाठी ई-सेवा केंद्रावरून धावपळ चालवली आहे.

राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याकरिता महात्मा ज्योतिराव फुले योजने अंतर्गत शेतकरी कर्जमुक्ती योजना घोषित केली आहे. या योजनेमध्ये जिल्‍ह्यातील पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या नावे असलेली बँकेची कर्जमाफी मिळविण्याकरिता पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना त्यांचे आधार प्रमाणीकरण असणे बंधनकारक केले आहे. शासनाकडून महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना पोर्टलवर पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यादी प्रशासनाला प्राप्त झाली असून बँकेकडून ७२ हजार २१० विशिष्ट क्रमांकासह असलेली कर्ज खाती व शेतकऱ्यांची यादी प्रसिद्धी करण्यात आली आहे.

प्रमाणीकरण केल्यावर मिळणार रक्कम
या योजनेमध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनी पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, शिधापत्रिका, बँक खाते पासबूक व आधार कार्ड प्रमाणीकरण करून घेतल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या नावे असलेले बँकांचे कर्ज माफ होऊन तेवढी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.

तक्रार असलेली ६६६ खाती
यात तक्रार असलेली ६६६ खाती असून यात डीएलसीद्वारे तक्रार निवार झालेली खाती आठ आहेत तसेच डीएलसीकडे तक्रार निवारणसाठी प्रलंबित २८५ खाती आहेत. तहसीलद्वारे तक्रार निवारणाठी झालेली खाती ११० यात प्रलंबित खाती २६३ आहेत.

२८ हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण होणे शिल्लक
आतापर्यंत ४४,४५० शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घेतले असून अजूनही २७,७६० शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण होणे शिल्लक आहे. ज्या शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली, त्या शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात कर्जाची रक्कम जमा होत असून मागील दोन दिवसांत पाच हजार ५२१ शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता व आधार प्रमाणीकरण केले असून या शेतकऱ्यांच्या नावे असलेले ४२ कोटी रुपयांचे कर्ज शेतकऱ्याच्या नावे असलेल्या बँक खात्यात जमा झाल्याची माहिती जिल्‍हा उपनिबंधक सुधीर मैत्रेवार यांनी दिली.

तहसील कार्यालयात कक्ष स्थापन
शासनाच्या कर्जमुक्ती योजनेत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करून घेण्यासाठी तहसील कार्यालयात कक्ष स्थापन करण्यात आला असून महा-ई-सेवा केंद्र, आपले सरकार व संग्राम ई- केंद्रावरून शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करून देण्याकरिता प्रशासनाकडून संबंधित केंद्र संचालकांना सूचना दिल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com