

The severely damaged Mathpimpalgaon–Nagzhari road in Ambad taluka has made daily travel risky for villagers, students and motorists.
Sakal
अंबड : एकीकडे सरकार म्हणते रस्ते या विकासाच्या नाड्या आहेत. मात्र हे बोलण्यापुरते ठीक आहे. ग्रामीण भागात दळवळणासाठी रस्त्यांची झालेली प्रचंड दुरावस्था झाली आहे.यामुळे ग्रामस्थ, विद्यार्थी व वाहन चालक यांना जीव मुठीत धरून अक्षरशा तारेवरची कसरत करावी लागत आहे.याकडे ना शासनाचे लक्ष आहे. ना प्रशासनाचे लक्ष आहे. लोकप्रितिनिधीने मतदार संघातील विकास कामाकडेच पाठ फिरविल्याचे चित्र सध्या पाहण्यासाठी मिळत आहे.