

Beed news
esakal
किल्ले धारूर: पहाटे डोळ्यावरची झोप उडण्याचे आमचे कारण वेगळेच आहे... काळजाचा ठोका चुकतो, तो फक्त एक घागर पाण्यासाठी! डोक्यावर रिकामी घागर घेऊन बोअरवेलवर रांगा लावायच्या आणि उन्हात तासन्तास उभं राहायचं, तेव्हा कुठं आमची बारी येते.
पण नशिबी येते फक्त चार घागरी पाणी. एवढ्याशा पाण्यात संसाराचा गाडा ओढायचा कसा आणि लेकराबाळांची तहान भागवायची कशी? ही आर्त व्यथा आहे किल्लेधारूर तालुक्यातील असोला येथील त्रस्त महिलांची आणि गावकऱ्यांची.