

Hingoli News
esakal
येहळेगाव: औंढा नागनाथ तालुक्यातील रेती घाटांचा लिलाव झाल्यापासून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रेती उपसा आणि वाहतूक सुरू झाली आहे. मात्र, ही वाहतूक करणारे टिप्पर आणि हायवा चालक रस्त्यावरून अतिवेगाने वाहने चालवत असल्याने सामान्य नागरिक, शेतकरी आणि पादचाऱ्यांच्या जिवाचा घोर वाढला आहे.
‘अधिकृत परवाना असतानाही ही वाहने एवढ्या वेगाने का पळवली जात आहेत?’ असा संतप्त सवाल आता सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे.