नेटवर्क डाऊन! मागील 4-5 दिवस कुठल्याच कंपनीची रेंज नाही; ग्रामस्थ वैतागले

range
range

गवळीशिवरा (औरंगाबाद): तंत्रज्ञानाच्या युगात आज काही सर्व सोपे सोयीस्कर झालं असून यासाठी इंटरनेट सेवा अत्यावश्यक बाब बनली आहे. मात्र हीच भारत संचार निगमची नेटवर्क सेवा चार ते पाच दिवसांपासून कोमात गेल्याने  ग्राहकांना फटका बसला आहे. बीएसएनएल ची नेटवर्क सेवा विस्कळीत झाल्याने ग्राहकांची चांगलीच फजिती होत असून कामाचा खोळंबा होत आहे.

गवळीशिवरा (ता.गंगापुर) येथील बीएसएनएलच्या टॉवरमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने परिसरातील या कंपनीच्या ग्राहकांना व शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील तीन दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे बीएसएनएल कंपनीचे नेटवर्क गायब झाले आहे. त्यामुळे बीएसएनएल च्या नेटवर्कवर अवलंबून असलेली सर्व सुविधांचा बट्ट्याबोळ उडाला आहे.

नेटवर्क डाऊनचा हजारो ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र मागच्या तीन दिवसांपासून बीएसएनएलची सेवा कोमात गेली आहे. कॉल कट होणे, रेंज गायब, नेटवर्क तर कसलेच मिळत नाही. BSNL ने फास्ट इंटरनेट सेवा देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मोबाईल  ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्वस्त दरात सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.

अखंडित व मजबूत सेवा देण्यासाठी व आपली पकड मजबूत करण्याची तयारी केली आहे. यामध्ये इतर कंपनीच्या तुलनेत सरस असे प्लॉन कंपनीकडून देण्यात आले. यामध्ये शेतकरी प्लान, रामदेव बाबा प्लान, विद्यार्थी प्लान असे विविध प्रकारचे प्लान देऊन अनेक ग्राहकांना आकर्षित केले. यामुळे परिसरातील अनेक ग्राहकांनी या प्लानचे रिचार्ज केले आहेत. परंतू मागील काही दिवसांपासून ही सेवा कोमात गेल्याने ग्राहकामधून तीव्र नाराजी होत आहे व सेवा पुर्वरत करण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com