औरंगाबाद : नागपूर-मुंबई महामार्ग बंद

शेतशिवारासह लासूरगावात पाणी शिरण्याची शक्यता वर्तवली जात असून प्रशासनाने सावधगिरीचा इशारा दिला आहे.
नागपूर-मुंबई महामार्ग बंद
नागपूर-मुंबई महामार्ग बंदsakal

लासूर स्टेशन (जि.औरंगाबाद) : लासूर स्टेशन परिसरात रात्री तीन वाजेपासून संततधार पाऊस सुरू असून लासूरगाव (ता.वैजापूर) येथून वाहणारी शिवनानदीला पुन्हा एकदा पूर आला आहे.नदीवरील फरशी पुल पाण्याखाली असून मुंबई महामार्गावरील पुलावरही पाणी जाण्याची शक्यता असून बोर दहेगावच्या बोर नदीच्या पुलावरूनही गुडघाभर पाणी वाहत असल्याने वाहतूक खोळंबली असून महामार्ग बंद झाला आहे. लासूरगावात तब्बल तीस वर्षांनी अशी पूर परिस्थिती दुसऱ्यांदा ओढवली.देवी दाक्षायणी मंदिराला पाणी लागले असून शिवना टाकळी प्रकल्पातुन पाणी सोडल्याने नदीकाठच्या शेतशिवारासह लासूरगावात पाणी शिरण्याची शक्यता वर्तवली जात असून प्रशासनाने सावधगिरीचा इशारा दिला आहे.

नागपूर-मुंबई महामार्ग बंद
अकोला : ‘आम्ही अकोलेकरांना’ मिळाला केंद्राचा कौशलाचार्य पुरस्कार!

लासूर स्टेशन परिसरात रात्रीपासून संततधार पाऊस सुरू असून लासूरगावच्या शिवना नदीला पुन्हा एकदा पूर आला आहे.दरम्यान नदीवरील फरशी पुल दिसेनासा झाला असून पाण्याचा प्रवाह वेगाने असल्याने वाहतूक बंद आहे.लासूरगावासह अमानतपुरवाडी, राहेगाव, भायगाव, उंदिरवाडी, धोंदलगाव आदी गावांचा लासूर स्टेशनशी संपर्क तुटला असून नदीकाठी असलेल्या दाक्षायणी देवीच्या मंदिराला पाणी लागले तर गेल्या काही दिवसांपूर्वी गावात वेशीपर्यंत पाणी पोचले होते तशीच काहीशी पूरपरिस्थिती उदभवणार असल्याचे दिसत आहे.बोर दहेगावच्या बोर नदीला पूर आलेला असल्याने वाहतूक खोळंबून नागपूर मुंबई महामार्ग बंद झाला आहे.सावंगीची मार्तंडी नदीची ओसंडून वाहत असल्याने नदीवर अवलंबून असलेला शिल्लेगाव प्रकल्प यंदा भरण्याची चिन्हे आहेत.

नागपूर-मुंबई महामार्ग बंद
पावसाचे थैमान संपता संपेना; निसर्गाच्या लहरीपणासमोर बळीराजा हतबल

परिसरात पडलेल्या प्रचंड अशा पावसाने छोटे मोठे पाझर तलावही फुल्ल झाले आहे तर शिवना नदीतील सर्वच केटीवेअर मागच्या पुरातच फुटल्याने पाणी अडण्याची शक्यता नाही.शिवनाच्या फरशी पुलावरून पाणी असल्याने पाण्याचा अंदाज येत नाही त्यामुळे लासुरगावात जाणाऱ्यांना परतून तब्बल सहा किलोमीटर फेरा मारून मुंबई महामार्गावरील पुलावरून लासुरगावात जावे लागत आहे. या फरशी पुलाची उंची वाढवावी अशी मागणी कित्येक वर्षापासून करण्यात येत आहे.या तिन्ही नद्यांच्या पाण्यामुळे विहिरींची पाणीपातळी वाढली आहे.परंतु शेतात पाणी तुंबल्याने पिके सडली असून शेतकऱ्याने अतोनात नुकसान झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com