Sakal Book Festival : खरा आनंद पुस्तक वाचनातूनच, मान्यवरांचे मत; सकाळ पुस्तक महोत्सवाचे शानदार उद्घाटन

Sakal Book Festival Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये सकाळ माध्यम समूह व महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन झाले. मान्यवरांनी वाचन संस्कारक्षम पिढीसाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले. सोशल मीडियापेक्षा पुस्तक वाचन श्रेष्ठ असल्याचा संदेश दिला.
Sakal Book Festival Ahilyanagar

Sakal Book Festival Ahilyanagar

sakal

Updated on

अहिल्यानगर : सकाळ पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून अहिल्यानगरकरांना एक पर्वणी उपलब्ध झाली आहे. संस्कारक्षम पिढी घडण्यासाठी पुस्तक महोत्सवासारखे उपक्रम कौतुकस्पद आहेत. आज सोशल मीडियाचा प्रभाव कितीही वाढू द्या, खरा आनंद पुस्तक वाचनातूनच मिळतो, असे मत सकाळ पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात सर्वच मान्यवरांनी व्यक्त केले.

सकाळ माध्यम समूह आणि अहिल्यानगर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सावेडीतील जॉगिंग ट्रॅक मैदानावर गुरुवारी (ता. १९) सकाळ पुस्तक महोत्सवाचे मान्यवरांच्या हस्ते शानदार उद्घाटन झाले.

आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे, आदर्शगाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, नगरसेविका वर्षा सानप, नगरसेवक सुरेश बनसोडे, संपादक संभाजी पाटील, सहसंपादक प्रकाश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सूत्रसंचालन अमोल बागूल यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com