

Beed News
esakal
बीड: शहरातील रस्त्यांना गेल्या अनेक वर्षांपासून लागलेले वाहतूक कोंडीचे ग्रहण आता सुटण्याची चिन्हे आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या ६४ लाख रुपयांच्या विशेष निधीतून शहरातील चार प्रमुख चौकांमध्ये अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानावर आधारित सिग्नल यंत्रणा बसवण्याच्या कामाला शनिवारी (ता. २१) सायंकाळपासून प्रत्यक्ष सुरवात झाली. या स्मार्ट बदलामुळे केवळ वाहतूक समस्याच सुटणार नाही, तर बेशिस्त वाहनधारकांना डिजिटल चाप बसणार आहे.