
औरंगाबाद - कोरोनामुळे गर्दी टाळण्याचा सल्ला दिला जात आहे; पण सर्वाधिक गर्दी होणारे ठिकाण म्हणजे शाळा आहेत. येथे होणारी गर्दी ही चिमुकल्यांची आहे. विद्यार्थी हा सर्वांत जास्त समूहाच्या संपर्कात येतो.
समूहामुळे कोरोनाचा संसर्ग जास्त वाढू शकतो, अशी भीती असल्याने राज्य सरकारने खबरदारी म्हणून राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसह सर्वच सहा हजार शाळा व महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. मात्र, दरम्यान दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे. आता राज्यातील सर्व जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
वाचा... विनाअनुदान शाळांना मिळणार अनुदान
जिल्ह्यात महापालिकेच्या ७२, नगरपालिका, नगर परिषदेच्या १९, खासगी अनुदानित प्राथमिक १७२३, स्वयंअर्थसाहाय्याच्या ७९३, अनुदानित प्राथमिक व माध्यमिक १५०६ व जिल्हा परिषदेच्या दोन हजार ११३ अशा एकूण सहा हजार २२६ शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, दहावी आणि बारावीच्या परीक्षांबरोबरच विद्यापीठांमधील परीक्षा वेळापत्रकानुसारच होतील, असेही पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
आश्चर्य वाचा - आम्ही अंभईचे, निघाले मुंबईचे... बारावीच्या परीक्षेतील प्रकार
जिल्हा परिषदेच्या शाळांबाबत होता संभ्रम
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरी भागातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे; मात्र जिल्हा परिषदेच्या शाळा नियमित सुरू राहणार असल्याचे विभागाकडून कळवण्यात आले होते; परंतु अनेक विद्यार्थी, शिक्षक, पालक हे शहरी भागातून ये-जा करतात. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे असे शिक्षक, पालक किंवा इतर विद्यार्थी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या संपर्कात येऊ शकतात. या समूहामुळे कोरोनाचा संसर्ग जास्त वाढू शकतो. त्यामुळे पालकांमध्ये एकप्रकारे भीतीचे वातावरण होते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांबाबतही शासनाने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून केली जात होती. अखेर सोमवारी प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी हा निर्णय निर्गमित केला आहे.
हे ही वाचा - शाळांच्या अनुदानाची वाट मोकळी
शिक्षकांबाबत
प्रश्नचिन्ह कायम
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील सर्वच शाळा बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु शिक्षकांनी शाळेवर जावे की जाऊ नये, याबाबत अजूनही संभ्रम आहे. याबाबत सध्या उच्चस्तरावर बैठक घेण्यात येत आहे. लवकरच शिक्षकांबाबतही निर्णय घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
बहुतांश शिक्षक हे शहरी भागातून ग्रामीण भागात शाळेवर ये-जा करीत असतात. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. ज्या शिक्षकांना १० वी व १२ वी बोर्डाच्या परीक्षेचे पर्यवेक्षण, पेपर तपासण्याचे काम असेल त्यांनी मंडळाच्या आदेशाप्रमाणे काम करावे. ज्या शिक्षकांना अध्यापनाव्यतिरिक्त कामे सोपविली असतील, त्यांनी ती घरून करावीत. शिक्षकांना अध्यापनाच्या कामाव्यतिरिक्त शाळेत बोलावू नये.
- दीपक पवार, जिल्हाध्यक्ष, शिक्षक सेना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.