Aurangabad : कचऱ्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर

सूक्ष्म नियोजनामुळे तक्रारी शून्य : पालिका उपायुक्त जाधव यांची माहिती
Aurangabad municipal corporation
Aurangabad municipal corporation

औरंगाबाद : गेल्या आठवड्याभरापासून महापालिकेतर्फे रस्त्यावर पडलेला कचरा उचलण्यासाठी सूक्ष्म नियोजन केले आहे. यामुळे दिवाळीत झोननिहाय कचरा उचलण्यात येत असल्यामुळे याबाबत कुठल्याच तक्रारी येत नाही. आता बाजारपेठेतील कचरा उचलण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर करण्यात येत असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त सोमनाथ जाधव यांनी दिली.

दिवाळीत प्रत्येत घरात साफसफाई करण्यात येते. अनेकजण रंगरंगोटीही करतात. त्यामुळे घरातील कचरा मोठ्या प्रमाणात बाहेर येतो. बाजारपेठेतही विविध साहित्य विक्रीला येतात. हातगाड्यांवर साहित्य विकणारे जागेवरच कचरा सोडून रात्री निघून जातात.

रात्री पैठणगेट, गुलमंडी, रंगारगल्ली, सिटीचौक, शहागंज, सराफा, कॅनॉट प्लेस, टी.व्ही. सेंटर, फटाका मार्केट आदी ठिकाणी कचरा साचलेला दिसून येतो. त्यासाठी वॉर्ड कार्यालयांची चार दिवसांपूर्वीच उपायुक्त जाधव यांनी बैठक घेतली. दिवाळीत पहाटे सर्व रस्ते स्वच्छ झालेच पाहिजे. रात्रीतून बाजारपेठेतील कचरा उचलण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या. त्यामुळे ऐन दिवाळीत एकही तक्रार मनपाकडे आली नाही.

रेड्डी कंपनीकडूनही चांगले सहकार्य मिळत असून, घंटागाड्या, मोठ्या वाहनांच्या अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. दररोज ३५० ते ४०० मेट्रिक टन कचरा शहरात जमा होतो. दिवाळीत किंचित वाढ झाली असल्याचे जाधव यांनी नमूद केले.

पुढील चार ते पाच दिवस नागरिकांना, व्यापाऱ्यांना कचऱ्याचा कोणताही त्रास होऊ नये यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण शहरात साफसफाईसाठी २ हजार सफाई मजूर कार्यरत असून, त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी काही अतिरिक्त स्वच्छता निरीक्षकही नेमण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com