Aurangabad : रेल्वेस्थानकासाठी २२५ कोटींची तरतूद

औरंगाबादेत अडीच वर्षांत पूर्ण होणार काम
Aurangabad Railway Station
Aurangabad Railway Stationsakal

औरंगाबाद : यूपीए सरकारच्या काळात रेल्वेसाठी अकराशे कोटींची तरतूद केली जात होती. आम्ही केंद्राच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी ११ हजार कोटींची तरतूद करत आहोत. आगामी बजेटमध्येही समाधानकारक तरतूद महाराष्ट्राला मिळणार आहे. तसेच औरंगाबाद आणि जालना रेल्वेस्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी सहा जानेवारीला टेंडर काढण्यात आले. यात औरंगाबादसाठी २२५ कोटी तर जालन्यासाठी १७५ कोटींची तरतूद केल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी (ता.१२) पत्रकार परिषदेत दिली.

श्री. दानवे म्हणाले की, मराठवाड्यातील रेल्वेच्या तोंडाला पाने पुसली असे आरोप अनेकजण करीत होते. मात्र आता रेल्वेची अनेक कामे झाली आहेत. यात विद्युतीकरण, दुहेरीकरण पीटलाइन, नवीन रेल्वे सुरू करणे अशा अनेक गोष्टी केल्या आहेत. आता २०२३ मध्ये रेल्वेच्या विद्युतीकरण आणि ब्रॉडगेजवर भर दिला जाणार आहे.

सहा जानेवारीला औरंगाबाद आणि जालना रेल्वेस्थानकासाठीचे आधुनिकीकरणासंदर्भात टेंडर काढण्यात आले आहेत. या निविदांची मुदत ९ मार्चपर्यंत असेल. त्यानंतर जून किंवा जुलैपर्यंत प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल आणि अडीच वर्षांत हे काम पूर्ण होणार आहे. औरंगाबाद रेल्वेस्थानकासाठी कैलास लेण्यांची थीम वापरली जाणार आहे. भव्य अशा रेल्वेस्थानकात हॉटेल्स आणि मॉलही असतील, असेही दानवे यांनी सांगितले.

मार्चपर्यंत धावणार विद्युतीकरणावर रेल्वे

मनमाड ते औरंगाबाद दुहेरीकरणासाठी अम्ब्रेला योजनेतून इस्टिमेट फायनल झाले असून, ते निती आयोगाकडे पाठवण्यात आले आहे. यासह मार्चपर्यंत मुंबई ते औरंगाबाद अशी इलेक्ट्रिसिटीवर रेल्वे धावेल. ही रेल्वे मार्चपर्यंत धावेल, असेही दानवे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com