
औरंगाबाद : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी जलाशयामध्ये पाण्याचा मुबलक साठा असला तरी ते पाणी वाहून आणणारी यंत्रणा जुनाट झाली आहे. परिणामी गळतीचे प्रमाण अधिक आहे. पालिका प्रशासनाने पाच एमएलडीने पाणीसाठा वाढविला असला तरी फारोळा येथील जलशुद्धीकेंद्रापासून शहरापर्यंत येता येता त्यात सात एमएलडीची गळती होऊन पाणी वाया जात आहे. त्यामुळे नागरिकांनी लाईन लॉस कधी घटणार अन् कधी मुबलक पाणी मिळणार असा सवाल उपस्थित केला आहे.
जायकवाडी जलाशयातून फारोळ्यापर्यंत १३५ एमएलडी पाणी येते. मात्र, तेथून पुढे पाणी शुद्ध करून नक्षत्रवाडी येथील एमबीआरला पाठवले जाते. तेव्हा तब्बल १३० एमएलडी पाणी पोहचते आणि प्रत्यक्ष शहरात वितरित करण्यासाठी १२८ एमएलडी पाणी मिळते. म्हणजेच सात एमएलडीची गळती होत असल्याचे निदर्शनास आले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीतून गळती होणारे सात एमएलडी पाणी शहरापर्यंत आले तर सुमारे पाच हजाराहून अधिक कुटुंबाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. जायकवाडीतून फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रात नेमके किती पाणी येते आणि शुद्ध झाल्यानंतर किती पाणी नक्षत्रवाडीला पाठवले जाते. यासाठी फ्लो मीटर बसविण्यात आले आहेत. शनिवारी माध्यम प्रतिनिधींनी या फ्लो मीटरची पाहणी केली.
यावेळी प्लोमीटरनुसार फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रातून नक्षत्रवाडीकडे १३५ एमएलडी पाणी पाठवले जाते. तिथल्या अधिकाऱ्यांचेही तेच मत आहे. शुद्ध झालेले पाणी नक्षत्रवाडी येथे डोंगरावर असलेल्या एमबीआर प्रकल्पात येते आणि तेथून शहरात वितरित होते. या ठिकाणी नेमके किती पाणी येते. याची माहिती मनपाच्या अधिकाऱ्यांना विचारली असता सुमारे १३० एमएलडी पाणी नक्षत्रवाडी येथील एमबीआर मध्ये पोहचते असे त्यांनी सांगितले. त्यामुळे रोज शहरात तब्बल १२८ एमएलडी पाणी पोहचते असे प्रशासनाकडून सांगितले जाते आणि त्यातील ५ पाच एमएलडी पाणी छावणी परिसरासाठी दिले जाते. याशिवाय शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रेल्वे यांना देखील यातून पाणी दिले जाते. प्रत्यक्षात शहरासाठी १२५ एमएलडी पाणी मिळते. तरी देखील शहराला सहा दिवसाआड पाणी मिळेल अशी परिस्थिती आहे.
हा लाईन लॉसचा प्रकार
शहरातील तीव्र पाणी टंचाई लक्षात घेता पाणी पुरवठ्यात वाढ करण्यासाठी सर्व पातळीवर काम करण्यात आले. एक पंप वाढविल्यानंतर साडे पाच एमएलडी पाणी वाढले. मात्र, फारोळ्यापासूनची तब्बल सात एमएलडीची गळती सुरूच आहे. याबाबत महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागचे प्रमुख हेमंत कोल्हे यांनी हा लाईन लॉसचा प्रकार आहे. ते कमी करण्यासाठी कायम प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.