

Beed News
esakal
बीड: मार्च महिन्याच्या सुरुरवातीपासूनच उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने बीड जिल्ह्यातील जलसाठ्यांनी तळ गाठण्यास सुरवात केली आहे. जिल्ह्यातील लघु, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठा दिवसेंदिवस झपाट्याने घटत असून, ग्रामीण भागात आतापासूनच भीषण टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. विशेष म्हणजे, परिस्थिती गंभीर होत असताना आणि बाष्पीभवनाचा वेग वाढत असतानाही जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने अद्याप टंचाई निवारण आराखडा अंतिम केला नसल्याने प्रशासकीय यंत्रणेच्या ढिसाळ नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.