
छत्रपती संभाजीनगर : विद्यादीप बालगृहातील मुलींनी पलायन केल्याच्या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्वतःहून दखल घेतली. या प्रकरणात विद्यादीप बालगृहाचा परवाना संपल्यानंतर सदरील मुलींचे कायद्यानुसार इतर बालगृहात स्थलांतर केव्हा करणार याची शपथपत्रासह माहिती सादर करावी, असे आदेश न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. संजय देशमुख यांनी दिले आहेत.