Chh. Sambhaji Nagar : लिचेडच्या घाण पाण्यामुळे पिके करपली

चिकलठाण्यात कचरा प्रक्रिया केंद्राला शेतकऱ्यांनी ठोकले कुलूप
sambhaji nagar
sambhaji nagar sakal

छत्रपती संभाजीनगर - चिकलठाणा येथील डेपोत साठवलेल्या कचऱ्यातून घातक आणि दुर्गंधीयुक्त लिचेडचे पाणी नाल्यात सोडण्यात आले आहे. हेच पाणी शेतीला जात असल्याने पिके उद्धवस्त झाली आहेत. तर मानवी आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे, यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी रविवारी कचरा प्रक्रिया केंद्राला कुलूप ठोकले.

नारेगाव येथील कचरा डेपो बंद करुन चिकलठाणा कचरा प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी केली जात होती त्यावेळपासूनच या परिसरातील शेतकऱ्यांनी कचरा डेपोला विरोध केला आहे. प्रक्रियेसाठी साठवलेल्या कचऱ्यावर पाणी पडून प्रक्रिया प्रकल्पातून निघणाऱ्या लिचेडमुळे या परिसरातील विहिरी आणि विंधनविहीरीचे पाणी दूषित होऊन शेती धोक्यात आली आहे.

शेतातील पिके करपून जात आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. या भागातील शेतकऱ्यांची मागणी आहे की, महापालिका प्रशासनाने लिचेडचे घाण पाणी नाल्यात न सोडता ड्रेनेजलाईनमध्ये सोडावे. मात्र, अनेकदा मागणी करुनही प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गणेशोत्सवामध्ये झालेल्या जोरदार पावसाने लिचेडचा हौदओसंडून वाहिल्याने लिचेडचे घाण पाणी नाल्यात सोडण्यात आले.

sambhaji nagar
Chh. Sambhaji Nagar : लग्नाचा ‘ऑनलाईन’ वादा, बसला १६ लाखांचा गंडा!

त्यामुळे नाल्याच्या काठावर असलेल्या शेतीतील पिके जळून जात असून विहीरी आणि विंधन विहीरींचे पाणी दूषित झाले आहे. महापालिका प्रशासनाकडून लिचेडची विल्हेवाट लावण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली जात नसल्यामुळे संतप्त झालेल्या चिकलठाणा येथील शेतकऱ्यांनी रविवारी (ता. एक) दुपारी कचरा प्रक्रिया प्रकल्पावर दाखल झाले व त्यांनी प्रक्रिया केंद्राला कुलूप ठोकले.

sambhaji nagar
Solapur Crime : बस चुकल्याने, मागितली लिफ्ट, केला अत्याचार,आरोपी काही तासात जेरबंद

जोपर्यंत लिचेडच्या पाण्याचा बंदोबस्त केला जात नाही, ड्रेनेजलाईनमध्ये लिचेड सोडण्याच्या कामाला सुरुवात होत नाही, तोपर्यंत चिकलठाणा कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे कुलूप उघडले जाणार नाही. महापालिका प्रशासनाने आमच्यावर गुन्हे दाखल केले तरी आता मागे हटणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. यावेळी शेतकरी निलेश कावडे, सोमनाथ पवार, संतोष सुत्रे, अमोल गिरी, रमेश नवपूते, अंकुश कावडे, भास्कर कावडे, रावसाहेब कावडे, दिगंबर कावडे, नारायण गव्हाणे, मुक्तेश्वर करवंदे, शंकर नवपूते यांच्यासह ५० ते ६० शेतकरी उपस्थित होते.

sambhaji nagar
Solapur Crime : बस चुकल्याने, मागितली लिफ्ट, केला अत्याचार,आरोपी काही तासात जेरबंद

कचऱ्याचे डोंगर

चिकलठाणा कचरा प्रक्रिया प्रकल्प केंद्रावर कचऱ्याचे डोंगर तयार झाले आहेत. या कचऱ्यावर प्रक्रिया करणारे पत्र्याचे शेड चारी बाजूंना झालेल्या कचऱ्याच्या डोंगरामुळे झाकून गेलेले आहेत. सर्वत्र दुर्गधी पसरली असून या प्रक्रिया केंद्रात फिरता येत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. प्रक्रिया प्रकल्पाला शेतकऱ्यांनी कुलूप लावल्यामुळे या प्रकल्पात कचऱ्यावर प्रक्रिया करुन खत निर्मितीचे काम बंद पडले आहे. या प्रक्रिया केंद्रावर कोणीही जबाबदार अधिकारी, कर्मचारी नव्हते. संबंधित कंत्राटदार एजन्सीचे देखील कर्मचारी हजर नव्हते. प्रकल्प केंद्रात शुकशुकाट होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com