औरंगाबादमध्ये संसर्ग कमी होतोय, पण स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन

महापालिका प्रशासकांचे नागरिकांना आवाहन
covid 19
covid 19covid 19

औरंगाबाद: शहरातील कोरोना रुग्णांची (corona cases) संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. असे असले तरी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडता स्वयंशिस्त पाळावी, असे आवाहन महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी केली. लॉकडाऊन (lockdown), लसीकरण (vaccination) व नागरिकांच्या शिस्तीमुळे दुसरी लाट नियंत्रणात येत असल्याचे प्रशासकांनी सांगितले.

शहरात मार्च महिन्यात ३२ हजार रुग्ण तर एप्रिल महिन्यात ४१ हजार रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे शहरातील कोविड केअर सेंटर, खासगी, सरकारी रुग्णालये रुग्णांनी फुल्ल झाले. रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. पण प्रशासनाने चाचण्यांची संख्या वाढवून लसीकरणावर लक्ष केंद्रित केले. त्याचा परिणाम रुग्णांची संख्या कमी होत आहे.

covid 19
दिलासादायक! मराठवाड्यात रुग्णसंख्या पाच हजारांच्या आत; मृत्यूदरही घटला

एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून रुग्ण संख्या कमी होत आहे. मे महिन्यात बाधित रुग्णांची संख्या आता तीनशेच्या खाली आली आहे. लॉकडाऊन, लसीकरण आणि नागरिकांच्या स्वयंशिस्तीमुळेचे कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यात यश मिळत असल्याचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.

covid 19
रमजान ईदचा बाजार फुलणार, जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी

असे असले तरी नागरिकांनी सतर्कता बाळगावी. मास्क, सोशल डिस्टंसिंग, सॅनेटाईझरचा वापर करावा. लॉकडाऊन उघडल्यानंतरही नागरिकांनी स्वयंशिस्त पाळलीतरच दुसरी लाट थोपविण्यात यश मिळाले असे, म्हणता येईल, असे पांडेय यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com