‘जायकवाडी’तून कोणत्याही क्षणी विसर्ग

जलसाठा आता ७५ टक्क्यांवर, गोदाकाठच्या गावांना सतर्कतेची सूचना
Discharge of water from Jayakwadi any moment 75 percent Water storage
Discharge of water from Jayakwadi any moment 75 percent Water storage

नाशिक, पैठण - विश्रांती घेतलेल्या वरुणराजाने नाशिकमध्ये पुन्हा संततधार सुरू केल्याने चोवीस तासांत नांदूरमधमेश्‍वर धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग २८ हजार ५३ वरून ३९ हजार ३३८ क्युसेसपर्यंत नेण्यात आला आहे. अशातच, पैठण येथील जायकवाडी धरणातील जलसाठा सोमवारी रात्री दहाला ७५.१० टक्क्यांवर गेला. जायकवाडीमधील पातळी ४६२.३४ मीटर म्हणजे, इशारा स्थितीच्या पुढे गेल्याने या धरणातून विसर्ग सोडण्याच्या टप्प्यावर जलसाठा पोचला आहे. जलसंपदा विभागाच्या अभियंत्यांनी गोदावरी नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेची सूचना दिली आहे. स्थानिक प्रशासनातर्फेही सूचना देण्यात आल्या आहेत.

जलसंपदा विभागाच्या अभियंत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार जायकवाडी धरणाच्या दरवाज्यातून गोदावरीमध्ये विसर्ग करावा लागणार आहे. गोदावरीमधून जायकवाडीकडे नांदूरमधमेश्‍वर धरणातून आज सकाळपर्यंत २९.१०६ टीएमसी पाणी रवाना झाले आहे. आज सकाळपर्यंत गोदावरीमध्ये दारणा धरणातून ६.८०, गंगापूरमधून ४.१० टीएमसी, तर कडवामधून १.८५ टीएमसी पाण्याचा विसर्ग झाला आहे. जायकवाडीतील जलसाठा आज दुपारी ७३.९७ टक्क्यांपर्यंत पोचलेला असताना धरणात ३६ हजार २०६ क्युसेस आवक झाली होती.

गेल्यावर्षी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यानंतर जायकवाडीतील जलसाठा ३६ टक्क्यांपर्यंत होता. जायकवाडी धरण सलग चौथ्या वर्षी फुल्ल होण्याच्या दिशेने आहे. या धरणात मेंढीगिरी समितीच्या शिफारशीनुसार आवश्‍यक असलेला ६५ टक्के जलसाठा यंदा पहिल्यांदा ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या अगोदर झाला आहे. ३१ जुलैपर्यंत जायकवाडीमध्ये ७९ टक्के जलसाठा ठेवता येतो. मात्र नाशिक आणि नगर जिल्ह्यात संततधार सुरु असल्याने आणखी १३ दिवस एवढा साठा कसा सांभाळायचा, असा प्रश्‍न असल्याने विसर्ग सोडण्याच्या संबंधाने जलसंपदा विभाग निर्णय घेणार आहे.

मोठी आवक सुरूच

धरणातील पाणीसाठा आज रात्री दहाला ७५.१० टक्क्यांवर गेला. वरील धरणातून ३१ हजार ३३ क्युसेकन पाणी आवक सुरु आहे. धरणाची पाणी पातळी १५१७.१२ फूट झाली असून जिवंत पाणी साठा १६३२.१४८ दशलक्ष घनमीटर आहे. दरम्यान, धरणाची पाणी पातळी वाढत असल्यामुळे धरणातून कोणत्याही क्षणी गोदापात्रात पाणी सोडण्याचा इशारा जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी दिला आहे. धरणाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता ज्ञानदेव शिरसाट, अशोक चव्हाण, शाखा अभियंता बी. वाय. अंधारे आदी वाढत्या पाणी स्थितीवर लक्ष ठेवून आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com