धक्कादायक! दिवाळीच्या बाजाराला पैसे नसल्याने शेतकऱ्याने विष प्राशन करून संपवलं जीवन; अंगावर होतं तब्बल ८ लाखांचं कर्ज

Causes of Farmer Distress in Maharashtra : पैठण तालुक्यातील तुपेवाडी तांड्यात अतिवृष्टीमुळे पीक नुकसान, सततची नापिकी, कर्ज अन् दिवाळीच्या खरेदीच्या विवंचनेत ४५ वर्षीय शेतकरी नामदेव लालसिंग राठोड यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. शासन मदत मिळाली नाही.
Chhatrapati Sambhajinagar News

Chhatrapati Sambhajinagar News

esakal

Updated on

आडुळ (छत्रपती संभाजीनगर) : अतिवृष्टीने पिकांचे झालेले नुकसान, सततची नापिकी, बँकांचे घेतलेले पीककर्ज व लोकांची उसणवारी, त्यात शासनाची अतिवृष्टीची मदत ही नाही, हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण दिवाळी डोक्यावर आल्याने लेकराबाळांसह घरच्यांना कपडे व इतर साहित्य कसे खरेदी करावे, या विवंचनेत असलेल्या तुपेवाडी तांडा (ता. पैठण) येथील ४५ वर्षीय शेतकऱ्याने स्वतः च्या घरासमोर विषारी औषधी प्राशन करून आत्महत्या केल्याची (Maharashtra Farmer Distress) घटना रविवारी (ता.१९) रोजी घडली. मयत शेतकऱ्याचे नामदेव लालसिंग राठोड असे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com