

Parbhani News
esakal
गंगाखेड : जिल्ह्याचा पारा ४४ अंशावर गेला असतानाच मूलभूत सुविधांपैकी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या वीजपुरवठ्याचा प्रश्न गंभीर झाल्याने नागरिकांना उकाडा असह्य झाला आहे. विजेच्या लपंडावामुळे नागरिक, शेतकरी, मध्यम-लघु व्यावसायिक, उद्योजक, विविध शासकीय कार्यालये, बॅंका, विविध क्लासेसमधील कामकाज विस्कळित झाले. याकडे ‘महावितरण’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभिर्याने लक्ष देऊन वीजपुरवठ्यात तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.