
औरंगाबाद : कोरोनाला आळा घालण्यासाठी आणि संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी लसीकरण वाढवणे गरजेचे आहे. यासाठी आठवडी बाजारातील विक्रेते, फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, फेरीवाले यांना दुसरा डोस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. सोमवारी (ता.सहा) पासून जिल्हाभरात अशा विक्रेत्यांची तपासणी केली जाणार आहे. ज्यांनी दोन्ही डोस पूर्ण केले नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याबाबत जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, राज्यात कोविड १९ लसीकरणाचे प्रमाण ८२.७० टक्के असून त्यात औरंगाबाद जिल्ह्याचे लसीकरणाचे प्रमाण ७७.१४ टक्के आहे. हे प्रमाण राज्याच्या तुलनेत अतिशय कमी आहे. औरंगाबाद जिल्हा राज्यात लसीकरणाच्याबाबतीत १६ व्या क्रमांकावर आहे, यासाठी लसीकरण वाढणे गरजेचे आहे.
या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार, भाजीपाला विक्रेते, फळविक्रेते, फेरीवाल्यांकडे ग्राहकांची मोठी वर्दळ असते यासाठी लसीकरण होणे गरजेचे आहे. या विक्रेत्यांची व त्यांच्या कुटूंबियांच्या लसीकरणाच्या दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. याबाबत महापालिका हद्दीत महापालिका आयुक्त ,वॉर्ड अधिकारी, छावणी परिषद क्षेत्रात मुख्य कार्यकारी अधिकारी, नगर पंचायत क्षेत्रात मुख्याधिकारी, एमआयडीसी क्षेत्रात कार्यकारी अभियंता, ग्रामपंचायत क्षेत्रात गटविकास अधिकारी, ग्रामसेवक वेळोवेळी तपासणी करावी. यापुर्वी २७ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या आदेशाप्रमाणे लसीचे दोन्ही डोस घेतल्याची खात्री करावी. दुसरा डोस घेऊन १४ दिवस झाल्याची खात्री करावी.याप्रमाणे लसीकरण न झालेले भाजीपाला, फळ विक्रेते, फेरीवाले यांच्यावर सोमवार (ता.सहा) पासून दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.