Imtiaz Jaleel
Imtiaz Jaleel

शहराचे नाव बदलण्यासाठी यायचे,मग तुम्ही औरंगाबादला दिले काय : जलील

औरंगाबाद : जेव्हा आपल्याला मोठे आंतरराष्ट्रीय क्रीड विद्यापीठ देण्यात आले होते. ते पुण्याला कोणाच्या सांगण्यावरुन हलविण्यात आलेले आहे? सगळे लोक गप्प बसलेले आहेत. मी आज प्रश्न विचारण्यासाठी पालकमंत्र्यांकडे आलेलो आहे. आपण फक्त निवडणुकीच्या वेळी यायचं. लोकांच्या भावना भडकवण्यासाठी यायचे. शहराचे नाव बदलण्यासाठी यायचे. मग तुम्ही या मराठवाड्याला (Marathwada) आणि औरंगाबादला (Aurangabad) दिले काय, असा प्रश्न खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांना विचारला आहे. श्री.जलील हे माध्यमांशी आज रविवारी (ता.१५) बोलत होते. आज स्वातंत्र दिनी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई जात होते. त्यावेळी त्यांना जलील यांच्या नेतृत्वाखाली एमआयएमच्या वतीने काळे झेंडे दाखवून औरंगाबाद येथील क्रीडा विद्यापीठ पुण्याला (Sports University) हलविल्याचे निषेध करण्यात आले.

Imtiaz Jaleel
'एमआयएम'ने पालकमंत्री सुभाष देसाईंना दाखविले काळे झेंडे

श्री.जलील म्हणाले, की कशामुळे हे विद्यापीठ मराठवाड्यासारख्या मागासलेल्या भागातून कोणाच्या सांगण्यावरुन हलविले आहे. आमच्या मराठवाडा व औरंगाबादेतील जे तरुण आहेत त्यांच्यासाठी हे विद्यापीठ गरजेचे होते. त्यामुळे ते येथे क्रीडा विद्यापीठ व्हायला पाहिजे होते. मात्र दुर्दैव आहे की सगळे गप्प बसलेले आहेत. दीडशे एकर जागा हवी होती. १३५ एकर जाग निश्चित झाली होती. मात्र तीन राजकीय पक्षांच्या राजकारणामुळे क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलविण्यात आले आहे. आम्ही आमच आंदोलन सुरु ठेवू. आज आम्ही पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखविलेले आहेत. आम्ही आमचे आंदोलन तीव्र करणार आहोत. मुख्यमंत्री आल्यावर हे आंदोलन अधिक तीव्र करु, असा इशारा त्यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com