औरंगाबाद नामांतरावर पवार साहेब बोलले ते हास्यास्पद - इम्तियाज जलील

Imtiyaz Jaleel Latest marathi News
Imtiyaz Jaleel Latest marathi NewsImtiyaz Jaleel Latest marathi News

औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारने शेवटच्या कॅबिनेटच्या बैठकीत औरंगाबादचे नामांतर करून संभाजीनगर केले आहे. यानंतर अनेकांनी याचे स्वागत केले तर अनेकांनी विरोध केला. ‘मविआ’च्या किमान समान कार्यक्रमात नामांतराचा मुद्दा नव्हता. तसेच नामांतराच्या मुद्यावर सुसंवाद झाला नव्हता’ असे शरद पवार (Sharad Pawar) रविवारी औरंगाबादमध्ये म्हणाले होते. ‘औरंगाबाद नामांतरावर पवार साहेब बोलले ते हास्यास्पद आहे’, असे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) म्हणाले. (Imtiyaz Jaleel Latest marathi News)

एकनाथ शिंदे गटाने घेतलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. सरकारच्या भवितव्यावर अनिश्चिततेचे सावट असताना महाविकास आघाडी सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले. त्यापैकी औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय महत्त्वपूर्ण होता. अखेरच्या कॅबिनेटच्या बैठकीत मविआ सरकारने नामांतराचा निर्णय घेतला होता.

Imtiyaz Jaleel Latest marathi News
मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये, पूरस्थितीच्या पाहणीसाठी तातडीचा विदर्भ दौरा

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या या वक्तव्यावर खासदार इम्तियाज जलील यांनी सोमवारी (ता. ११) नाराजी व्यक्त केली. अनिल परब यांनी आदल्या दिवशीच औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा कॅबिनेटच्या बैठकीत मांडणार असल्याचे सांगितले होते. यामुळे या विषयी कोणाला माहिती नव्हते हे म्हणणे योग्य नाही, असेही इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) म्हणाले.

अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात व नाना पटोले नामांतरावर स्पष्टपणे बोलले होते. औरंगाबादच्या (Aurangabad) नामांतराला आम्ही विरोध केला नाही, असे बाळासाहेब थोरात म्हणाले होते. सत्तेसाठी गठबंधन केले तेव्हा नामांतराचा मुद्दा पुढे येऊ शकतो, असे लक्षात आले नव्हते का, असा सवालही जलील यांनी उपस्थित केला. कोणताही निर्णय सर्व मंत्र्यांच्या संमतीने होतात, असेही ते म्हणाले.

Imtiyaz Jaleel Latest marathi News
नागपूर : नाल्याच्या पुरात माय-लेकी गेल्या वाहून; आईचा मृतदेह सापडला

हिंदू-मुस्लिम असा रंग देऊ नका

अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात कधीही भाजपमध्ये जाऊ शकतात. फक्त औपचारिकता राहिलेली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्रामध्ये काही खरं नाही, असे त्यांना वाटत आहे. औरंगाबाद किंवा संभाजीनगर या निर्णयाला हिंदू-मुस्लिम असा रंग देऊ नका. या प्रकरणाला जातीय रंग देण्याची गरज नाही, असेही एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com